Chat on WhatsApp with +91 94227 69444
Continue to Chatडिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. महसूल विभागाने आचारसंहितेमध्ये तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील जलसंपदा विभागातील काही अधिकारी आचारसंहितेचे कारण देत असल्याचे समोर येत आहे . वास्तविक पाहता आचारसंहिते दरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर नाहीत त्यामुळे जलसंपदा विभागाने निवड यादी जाहीर करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तत्काळ दिलासा द्यावा व विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी ही विनंती.